सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील वाघजाळी येथील संत नामदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला २५ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल दि.२९ मार्च शनिवार रोजी रौप्य महोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सन २००० मध्ये शाळेची स्थापना झाली असुन शाळेला २५ वर्ष पुर्ण झाले असुन त्या निमित्ताने रौप्य महोत्सव व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रीत करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन हिंगोलीचे खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.तानाजीराव मुटकुळे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगांवकर होते तसेच मुख्य मार्गदर्शक कवी साहित्यिक केशव खंटीग सर होते.प्रमुख उपस्थिती मध्ये संस्था अध्यक्ष दाजीबा पाटील,सचिव परमानंद तांबिले,उपाध्यक्ष माधवराव तांबिले,माजी प्राचार्य कोल्हाळ सर होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन झाली.यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करीत शाळेंच्या आठवणींना उजाळा दिला.इयत्ता १० वी मधुन प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आजी माजी विद्यार्थ्यांचा तसेच शैक्षणिक क्षेत्र,सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव व सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,गोपु पाटील,भानुदासराव जाधव,उध्दवराव गायकवाड,कडुजी ढेंगळे,संतोष देवकर,पिंटु गुजर,शंकरराव भवर आदीसह माजी विद्यार्थी,पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दाजीबा पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीसाठी शिक्षकवृंद,कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.