shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकरी नेते एक होणार की कर्जमाफी झुलणार...!!

अहिल्यानगर:-
महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीदरम्यान शेतकरी नेते वेगवेगळ्या पक्षात निवडणुका लढले तर कोणी स्वतंत्र आघाडी करून निवडणुका लढवल्या या निवडणुकीच्या दरम्यान सर्वच शेतकरी नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले जे कोणी शेतकरी नेते सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत ते शेतकऱ्याचे म्हणून नाही तर सत्ताधारी भाजपाचे निवडणुकीपूर्वी सोबत घेतलेली भूमिकेमुळे आज सत्य मध्ये आहे ते शेतकरी नेते म्हणून असली तरी त्यांची शेतकऱ्यांसाठी असलेली उपयोगिता जवळजवळ संपलेली आहे अशी आता तरी शेतकऱ्याची भावना निर्माण झालेली आहे

सत्तेमध्ये राहून सत्तेसाठी सरकार शब्द ते भाजपाच्या पुढे काढतील अशी सध्याची तरी परिस्थिती नाही. शेतकरी साठी लढणाऱ्या स्वर्गीय शरद जोशी या महान विचारवंतांनी शेतकरी संघटना निर्माण केली अभ्यासू आणि धडाडीचे कार्यकर्ते घडविले देखील आज जे काही शेतकरी नेते आहेत त्या सर्वांचे दैवत शरद जोशी हेच असतील आणि आहेतच शेतकरी संघटना म्हटलं तर शरद जोशींच्या नावाशिवाय भाषण देखील पूर्ण होत नाही परंतु राजकीय अभिलाषा समजा अथवा अजून काही परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धार असायला हवी किंवा जनमत ते कुठल्याही शेतकरी संघटनेकडे अथवा शेतकऱ्यांचे काम करणाऱ्या पक्षाकडे नाही हे वास्तव सत्य स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारी शेतकऱ्याचे नेते कधी समजून घेतील हा मोठा प्रश्न आहे. 
राष्ट्रीय शेतकरी संघटना म्हणून काही संघटना जन्माला आल्या त्यांचे अस्तित्व एका जिल्ह्यात दोन ते पाच पदाधिकारी यापलीकडे नाही मात्र सत्ताधारी याच गोष्टीचा फायदा घेतात शेतकरी प्रश्न मात्र पूर्णत्वास जात नाही हे देखील सत्यच अनेकांनी शेतकरी संघटना काढल्या त्या शेतकरी संघटनेला वेगवेगळे नावे दिली उद्देश एकच आहे तो म्हणजे शेतकरी समस्या सुटावी प्रत्यक्षात मात्र या नेत्यांच्या डोक्यामध्ये कोणत्या समस्या आहे हा सर्व शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न यांच्या गुंतागुंतीच्या अथवा इतर बाबींच्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा गुंता मात्र वाढत चालला आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे. स्वतःचे लेटरहेड छापून कुठेतरी कोपऱ्यामध्ये फोटो काढायचा आणि शेतकरी साठी लढत असल्याचा भास निर्माण करायचा यामध्ये मात्र नुकसान शेतकरी बांधवांचे होते ज्यांच्यासाठी आपण भांडतो त्यांचे नुकसान आपण करतो याची थोडीशी तरी जाणीव या नेते मंडळींनी ठेवायला हवी अस्तित्वाचा खेळल्या गेलेल्या डावात कोणालाही मोठं न होऊ देण्याच्या जे काही राजकीय श्रेय पाहिजे ते मला स्वतःला यामध्ये सर्वांच्याच राजकीय नौका बुडाले या लेखामध्ये मी त्यांची नावे देखील टाकू शकतो परंतु त्यांचा शेतकऱ्यांसाठी असलेला त्याग लक्षात घेता ते टाकणे उचित होणार नाही आज प्रत्येक शेतकरी नेत्यांना माहिती आहे.

महाराष्ट्रामध्ये दिवसाला सात आत्महत्या होतात हे वास्तव असताना आपला बांधवा आत्महत्या करून मरत असताना शेतकरी नेत्यांना मात्र श्रेय वादाच्या लढाईचा पडला आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे स्वतःला नेते समजणारे स्वतःच्या ताकतीची जाणीव नसेल आणि कुठेतरी स्वतःचा राजकीय इगो बाजूला सारण्यास तयार नसतील तर शेतकरी प्रश्न झुलवत ठेवून यांना राजकीय नेत्याची लागण झाली असे म्हणायला हरकत नाही हे स्वतः डुबणार मात्र शेतकरी बांधवांना घेऊन डुबणार अशीच आजची परिस्थिती आहे सरळ आणि साधा प्रश्न आहे शेतकरी कर्जमाफीचा सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र बसून आपल्या ताकतीचा अंदाज घेऊन समन्वयी बैठक करून कोर कमिटी स्थापन करावी या या कमिटीने एकत्रित लढा उभारून धार द्यायला हवी नाहीतर फक्त शेतकरी नेत्यांना प्रश्न सुटणार नाही याची जाणीव तरी व्हायला हवी ही मागणी समाजातून जोर धरू लागली आहे छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करत असताना सर्वांना एकत्र केले होते आणि बाकी मावळ्यांनी देखील लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या उद्देशाने साथ दिली होती आज शेती आणि मातीचा प्रश्न अत्यंत बिकट परिस्थितीत आहे शेतकरी नेते स्वतःचा नेता तयार करून शकत नसतील तर संपलेले शेतकरी पक्ष आणि संघटना संपल्यात जमा आहे हे देखील सत्यच त्यामुळे शेतकरी संघटनेच्या सर्व राज्यस्तरीय नेत्यांनी याचा विचार करायलाच हवा तुम्ही ज्यांच्यासाठी भांडता तोच जिवंत राहिला नाही तर तुमच्या या नेते पदाला काडी लावायचे का असा सरळ आणि साधा प्रश्न आजची पिढी विचारत आहे. प्रत्येक शेतकरी संघटना आणि शेतकरी पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पक्ष संघटनेच्या नेत्याला हे सांगावे नाहीतर शेतकरी आत्महत्या साठी आपण देखील थोडासा का होईना निष्ठुरपणा दाखवत आहोत यापलीकडे काही नाही.       
  
ऍड. पांडुरंग केशव औताडे 9890273656
close