भारतीय सैन्याने व सरकारने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून जी कारवाई केली त्यावरून या कारवाईचे जसे देशभर समर्थन होत आहे तसेच त्यासंबंधी काही प्रश्नही विचारले जात आहेत त्यामुळे ठिकठिकाणी वादही निर्माण होत असल्याचे चित्र देशभरात दिसून येत आहे , परंतु वाद हा राष्ट्र, धर्म आणि भारतीय सैन्या विषयी येत असल्याने आणि आम्ही स्वतः सैनिक असल्याने अतिशय आनंद आणि दुःखही आहे हा विषय प्रसार माध्यमातून मोठ्या चर्चेत येत आहे याविषयीची अधिक माहिती अशी की कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांची माहिती माध्यमावर आली तेव्हा देशवासीयांना एक सुखद धक्का बसला सर्वांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांचे मनापासून कौतुक केले त्यानंतर या दोन्ही लढाऊ लेकीं बद्दल माहिती समोर आली की त्यातून भारताची प्रतिमा कशी उजळून निघत होती आणि महिला शक्ती कशी भक्कम आहे आणि त्यांच्या समोर शत्रू कसा नमतो हे देखील भारताने जगाला दाखवून दिले तर दुसऱ्या बाजूला या दोन्ही शूर महिलां विषयी वेगळ्या पद्धतीची माहिती प्रसारित झाली त्यात काही भारतीयांनी तर त्यांचा जात धर्म शोधण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे जो वाद निर्माण झाला तो वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे तर काहींनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला ज्यावेळी संपूर्ण देश शांततेची झोप घेत होता तेंव्हा या दोन्ही रणरागिणी पाकिस्तानला धुळ चाटवत होत्या आणि अशा चुकीच्या वक्तव्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली यामुळे राजकारण किती खालच्या पातळीवर केले जाते याची सामान्य जनतेला प्रचिती आली आहे.
खऱ्या अर्थाने या घटनेचा अर्थ शोधत असताना त्यात धर्म व जातीला कसे प्राधान्य दिले जाते हेही लक्षात आल्याशिवाय राहत नाही अशाप्रकारचे व्यक्तव्य सामान्य व्यक्तीने केल्यास त्याला देशद्रोही ठरवून कारवाई केली जाते आणि राजकीय मंडळींनी काहीही बोलले तरी चालते म्हणजेच एका सामान्य व्यक्तीला वेगळा आणि राजकीय व्यक्तींना वेगळा न्याय दिला जातो त्यामुळे देशात अशा वाचाळ वीरांच्या संख्येत सध्या बेसुमार वाढ होत आहे अशांना सरकारने आवर घालणे गरजेचे आहे जर वरिष्ठ लोकांची मानसिकता व विचारसरणी धर्मांधतेच्या किंवा बुरसटलेल्या विचाधारेवर आधारित असेल तर स्थानिक कार्यकर्ते देखील तसेच वागत असतात इतर समुदाया विषयी टिकेची व विषारी भाषा वापरली जाते व त्यामुळे देशात द्वेष भावना वाढत आहे आणि मग देशभरात सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेचा उपयोग काय अशा वेळी वाद वाढत गेला की माघार घेतली जाते नाहीतर माफी मागून वेळ निभावून नेली जाते काही वेळा तर माफीही मागितल्या जात नाही व माघारी घेतले जात नाही उलट आपण जे वक्तव्य केले त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असा दावा केला जातो.मात्र जनसामान्यांना हे सर्व काही कळत असते त्यातून त्यांच्याही मनात प्रचंड चीड निर्माण होते करीता अशा वाचाळांना वेळीच आवर घातला गेला पाहिजे अन्यथा येणारा भावी काळ हा मोठा आडचणीचा ठरु शकेल हे मात्र नाकारुन चालणार नाही.
*लेखन
मेजर कृष्णा सरदार
श्रीरामपूर - 99221 93074
*प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111