shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार राजेंद्र देसाई वृक्षभूषण पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर [ प्रतिनिधी ] श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील पत्रकार राजेंद्र देसाई यांना स्वराज सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वृक्षभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रसंगी आदर्श सरपंच  भास्करराव पेरे पाटील पाटोदा यांनी उपस्थित  लोकनियुक्त सरपंच पोलीस पाटील  ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना संबोधित करत आदर्श गावाची व्याख्या तसेच वृक्षारोपण काळाची गरज जल है तो कल है या उक्तीप्रमाणे सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्राबद्दल माहिती दिली.

 या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प जयश्री ताई तिकांडे ऑननरी कॅप्टन प्रकाश त्रिभुवन प्रेरणास्थान श्री यादवराव पावशे संपर्क प्रमुख अमोल शेवाळे अध्यक्ष रोहित पवार  कार्यक्रमाचे आयोजक सरपंच सेवा संघाचे राज्य सचिव बाबासाहेब पावशे तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील होते श्री राजेंद्र देसाई यांनी पत्रकारिता तसेच गृहरक्षकदलाच्या  माध्यमातून सामाजिक ' अध्यात्मिक ' क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड , वृद्ध निराधार यांना मदत कार्य केले असे अनेक विविध उपक्रम राबविले याबद्दल वृक्ष भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते  देसाई यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी निपाणी वडगाव येथील माजी सरपंच रवींद्र पवार कृष्णा पवार  मेजर प्रकाश त्रिभुवन पशुवैद्यकीय डॉ करण राऊत  सामाजिक कार्यकर्त्या  सौ अंजली त्रिभुवन श्रीमती सिंधुबाई देसाई सौ  मीनाक्षी देसाई कवी  मृणाल देसाई श्रीवेद देसाई मोहिणी देसाई  सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पटेल ह भ प भानुदास खरात आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह भ प गोरडे महाराज यांनी केले  पावशे काका यांनी आभार मानले.
close