प्रदिर्घ प्रतिक्षा, अनेक चढउतार व स्थित्यंतरे घडल्यानंतर आरसीबीला आपल्या पहिल्या विजेतेपदाचा आनंदही जास्त काळ उपभोगता आला नाही. स्वागत समारंभ व आनंदोत्सवाच्या भाऊगर्दीत आरसीबीचे अकरा निस्सीम चाहते अक्षरशः धारातिर्थी पडले. त्यामुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली. कोणतीही मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर त्या संघाच्या आनंदाला उधाण येते. अशा परिस्थितीत त्यांचे खंदे समर्थक रस्त्यावर येतात. आगळ्या वेगळ्या प्रकारे आपला आनंद व्यक्त करतात. त्या दरम्यान त्यांच्याकडून अनेकदा नियमांचे उल्लंघन होते. असाच मोठा प्रकार आरसीबीच्या विजयोत्सवा दरम्यान घडला.
एकंदर अठरावी आयपीएल स्पर्धा या घटनेमुळेच लोकांच्या चर्चेत आली नाही तर प्रत्यक्ष खेळाच्या मैदानावरही अनेक मुद्द्यांवर वादग्रस्त ठरली. शिवाय भारत -पाकिस्तान यांच्यात झालेल्या युध्दामुळे स्पर्धा मध्येच तहकूब करावी लागली. युध्दबंदी नंतर पुन्हा ती पार पडली पण अनेक परदेशी खेळाडू युध्दाला घाबरून म्हणा की स्वतःच्या देशाच्या राष्ट्रीय सेवेसाठी गेले ते परत आलेच नाही. त्यांच्या जागी आलेले खेळाडू फारसे तोला मोलाचे होते असंही म्हणता येणार नाही. मात्र आयपीएलचा जो नेहमीचा अंदाज असतो त्याला अशा काही घटनांमुळे गालबोट लागले.
हा हंगाम अनेक प्रकारे मनोरंजकही होता. काही मोठे विक्रम झाले, तर एखाद्याच्या सेलिब्रेशनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. दिग्वेश राठीच्या नोटबुक सेलिब्रेशनवरून बराच वाद झाला असताना, विराट कोहलीला अवनीत कौरचा फोटो आवडल्याबद्दलही बरीच चर्चा झाली. तिलक वर्मा रिटायर्ड झाल्यावर चाहतेही संतापले. या हंगामातील काही सर्वात लक्षवधक वादांविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
दोन मे रोजी विराट कोहलीने अवनीत कौरचा फोटो लाईक केला होता. यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले. नंतर, विराटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो लाईक करण्यामागील कारण सांगितले आणि स्पष्टीकरण दिले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून, कोहलीने स्पष्टीकरण दिले जेणेकरून यासंदर्भात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये. तथापि, यामुळे आगीत तेल ओतले गेले. कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'मी हे स्पष्ट करू इच्छितो की कदाचित मी माझा फीड तपासत असताना चुकून प्रतिक्रिया दिली गेली असेल. यामागे कोणत्याही प्रकारचा हेतू नव्हता. मी आवाहन करतो की कोणतेही अनावश्यक अनुमान लावू नयेत, सर्वांचे आभार. यानंतर कोहलीला प्रचंड ट्रोल करण्यात आले. अनेक स्टार्सकडून प्रतिक्रिया आल्या. अवनीत कौर ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम करते. डान्स इंडिया डान्स लिल मास्टर्स, झलक दिखला जा, मर्दानी, चंद्र नंदिनी, अलादीन - नाम तो सुना होगा, आणि टिकू वेड्स शेरू या चित्रपटांमध्ये कौर तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे.
विराटने अवनीतचा फोटो लाईक केल्यानंतर गायक राहुल वैद्य सर्वाधिक चर्चेत आला. राहुल वैद्य यांचेही विधान बाहेर आले. राहुलने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत म्हटले आहे की, विराट कोहलीचे चाहते विराटपेक्षा मोठे विनोदी आहेत. याशिवाय, त्याने विराटच्या चाहत्यांवर त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ केल्याचा आरोप केला. अवनीतच्या फोटोला लाईक करण्याच्या स्पष्टीकरणात कोहलीने 'अल्गोरिथम' आणि 'इंटरअॅक्शन' सारखे शब्द वापरले. यानंतर राहुल वैद्य यांनी सतत पोस्ट करत विराटवर निशाणा साधला. त्याने असाही आरोप केला होता की, कोहलीने तिला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले होते. तथापि, काही दिवसांनी, वैद्य यांनी स्वतः एक अपडेट दिली की आता कोहलीने त्याला अनब्लॉक केले आहे. त्याने लगेचच यू-टर्न घेतला आणि म्हणाला, 'धन्यवाद विराट कोहली !' मला अनब्लॉक केल्याबद्दल. तू क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेस आणि तू भारताचा अभिमान आहेस ! जय हिंद. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो.
लखनौ सुपर जायंटसचा नवोदित फिरकीपटू दिग्वेश राठीच्या नोटबुक सेलिब्रेशनने बरीच मथळे मिळवली. मात्र, यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. दिग्वेशचा हा पहिलाच आयपीएल होता आणि त्याने त्याच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने १३ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट ८.२५ होता. यापैकी बहुतेक विकेट्स घेतल्यानंतर, दिग्वेशने नोटबुक सेलिब्रेशन केले आणि यासाठी बीसीसीआयनेही त्याच्यावर टीका केली. त्याला मोठा दंड ठोठावण्यात आला, पण दिग्वेश आनंद साजरा करत राहिला. विराट प्रमाणेच त्याला क्रिकेटचा बॅड बॉय देखील म्हटले जात आहे. यावरून त्याचा कर्णधार रिषभ पंतशी वादही झाला, पण दिग्वेश याला सहमत नव्हता. चाहत्यांनी त्याला 'उत्पन्न आठाणे आणि खर्च एक रुपया आहे' असे म्हणत ट्रोल केले. सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान, दिग्वेशने अभिषेक शर्माला नोटबुक सेलिब्रेशनसह परत पाठवले, पण त्याचा अभिषेकशी वाद झाला आणि दोघे जवळ आले. अभिषेकने त्याचे असलेले मोठे केस ओढण्याचा इशाराही केला होता. आरसीबी विरुद्धच्या लीग फेरीतील शेवटच्या सामन्यात दिग्वेशने जितेश शर्माला मांकडींग करण्याचा प्रयत्नही केला. तथापि, जितेश नाबाद राहिला. दिग्वेश हे करत असल्याने तेही चर्चेत राहिले.
अठराव्या आयपीएलचा पहिला वाद ४ एप्रिल रोजी समोर आला. त्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होता. त्या सामन्यात, मुंबई व्यवस्थापनाने अचानक निर्णय घेतला आणि तिलक वर्माला निवृत्त केले आणि त्याला डग आऊटमध्ये परत बोलावले. त्यावेळी मुंबईला जिंकण्यासाठी सात चेंडूत २४ धावांची आवश्यकता होती. या निर्णयामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. टिलक एक प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानावर आला, पण त्याला निवृत्त करण्यात आले. त्यामुळे चाहते खूप संतापले आणि त्यांनी कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. मुंबईने हा सामना गमावला. सूर्यकुमार यादव प्रशिक्षक जयवर्धनेकडे बोट दाखवत हे काय आहे? असे म्हणताना दिसला. हे का होत आहे? यावर जयवर्धनेने त्याच्या कानात काहीतरी सांगितले. जयवर्धने नंतर म्हणाले की, तिलक मोठे फटके मारू शकत नसल्याने हा त्यांचा निर्णय होता. या प्रकरणात मॅच फिक्सिंगचा वास असल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होता.
वादग्रस्त घटना नको असल्या तरी हा क्रिकेटचा अविभाज्य भाग बनला आहे. तरीही हा खेळ सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणूनच ओळखला जातो. त्याची महान परंपरा टिकवण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. मात्र स्वतःच्या फायद्यासाठी प्रत्येक जण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याकडे आयसीसी, बीसीसीआय या जागतिक क्रिकेटच्या प्रमुख घटकांनी काळजीने लक्ष देण्याची खरोखर युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
@. डॉ. दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२