समाजाच्या अंधारलेल्या वाटेवर प्रकाशाचा दीप लावणारे, शोषितांचे दुःख आपल्या अंतःकरणाशी जुळवून घेणारे आणि समाजाच्या हक्कांसाठी शासनदरबारी आवाज उठवणारे नाव म्हणजे रवि शिंदे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेली नम्रता, सुसंस्कृतपणा आणि स्नेहभाव समाजासाठी नवचैतन्य निर्माण करणारे ठरले आहे.
रवि शिंदे यांनी वडार समाजाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य हे केवळ शब्दांपुरते मर्यादित नाही, तर ते त्यांच्या घामाने, कष्टाने आणि सातत्याने सिद्ध झाले आहे. २०१८ साली लातूर येथे पार पडलेल्या वडार महामेळाव्याचा पुढचा टप्पा म्हणून त्यांनी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून शासन निर्णयांची पायाभरणी केली. त्यांच्या अशा चपला झिजवणाऱ्या कार्यामुळे वडार समाजाच्या अनेक मागण्या शासन दरबारी मान्य होण्यास प्रारंभ झाला.
फडणवीस साहेब तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्यासोबत त्यांनी जुळवलेले घनिष्ठ संबंध म्हणजे वडार समाजाच्या कल्याणासाठी असलेला विश्वासाचा पूलच म्हणावा लागेल. समाजातील त्रासलेल्या लोकांच्या न्यायासाठी ते नेहमीच सज्ज असतात. विशेषतः समाजातील काही निरपराध बांधवांवर ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल झाले असता, रवि शिंदे यांनी निर्भीडपणे प्रशासनासमोर भूमिका मांडून त्या अन्यायाला वाचा फोडली. पोलिस प्रशासनालाही त्यांच्या सजगतेची जाणीव करून दिली.
त्यांची कार्यपद्धती ही केवळ आंदोलनात्मक नाही, तर समजूतदारपणाने आणि व्यावहारिकतेने मार्ग काढणारी आहे. म्हणूनच आज वडार समाज त्यांच्या नेतृत्वात संघटनात्मक बळ, सामाजिक जागृती आणि आत्मगौरवाने पुढे वाटचाल करत आहे.
रवि शिंदे हे केवळ समाजसेवक नव्हेत तर वडार समाजाच्या भविष्याचा शिल्पकार आहेत. त्यांचे जीवन म्हणजे संघर्षातून उभारी घेणाऱ्या समाजासाठी प्रेरणादायी प्रकाशस्तंभ आहे. त्यांच्या विचारसंपन्नतेतून समाजाला दिशा मिळते, त्यांच्या कृतीतून समाजाला आधार मिळतो आणि त्यांच्या सहवासातून समाजाला आत्मविश्वास मिळतो.

