श्रीरामपूर:-श्रीरामपूर शहराजवळ असणाऱ्या वडाळा महादेव गावातील सौ.उषा निकम या त्यांच्या घराच्या परिसरात शेळ्या चारत असतांना या ठिकाणी ट्रॅप लावून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करत एका शेळीला जीवे ठार मारले.
या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच घटनास्थळी वनाधिकारी,ग्रामस्थ व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मदतीसाठी पोहचले.बिबट्यासाठी गाव शिवारात जास्तीत जास्त पिंजरे लावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
000

