स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
प्रतिनिधी - एरंडोल ‘माझे जीवीची आवडी नेई पंढरपुरा गुढी’, असे म्हणत चांदसर येथील पायी दिंडीचे भक्तीमय वातावरणात एरंडोल शहरात आगमन झाले. यावेळी शेकडो वारकर्यांनी भजन करीत टाळ मृदुंगाचा गजर केला. वारकर्यांच्या विठुरायाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. दिंडीचे यंदाचे हे 18 वे वर्ष असून पहिल्या वर्षापासून स्व. जयवीरबापू पाटील यांचे स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील आणि तालूका गटसचिव संघटनेने या दिंडीसाठी अन्नदानाचा चंग बांधला आहे. यंदा देखील मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत करून आरती करण्यात आली. यावेळी पानाफुलांनी सजविलेल्या रथामध्ये दर्शनासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणीची मुर्ती ठेवण्यात आली होती. तसेच रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी सामाजिक कार्यक़र्ते नरेंद्र पाटील, रमेशअण्णा महाजन, विजयअण्णा महाजन, रवीअण्णा महाजन, जगदीश ठाकूर, राजेंद्र पाटील खडके, नानाभाऊ महाजन, अमितदादा पाटील, नितीन बिर्ला, पी. जी. पाटील सर, बँक अधिकारी आणि पदाधिकारींनी आरती करून दिंडीचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील आणि गटसचिव अध्यक्ष राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विलास जगताप, मनोज पाटील, रविंद्र पाटील, पुरूषोत्तम पाटील, राजू अहिरे, पंडीत सपकाळे, बापू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मनोज पाटील, राजेंंद्र पाटील मधुकर पाटील, गुणवंतराव पाटील, विजय पाटील, विलास महाजन, नाना पाटील, गंगाधर पाटील, राजू पाटील यांचेसह उपस्थितांनी परिश्रम घेतले. शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय चा गजर करत दुपारी तीन वाजेच्या सुमारास पायीवारचे वारकरी पंढरपूर मार्गस्थ झाले.