प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३/ भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या राजकीय भवितव्यासाठी भाजपा पक्षाची संपूर्ण ताकत उभी करणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे सोलापूर (प) चे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे. करमाळा तालुक्यातील मौजे - मिरगव्हाण येथील शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, गणेशजी चिवटे हे हिंदुत्ववादी विचारावर चालणारा कार्यकर्ता असून गेल्या वीस वर्षात भाजपा पक्षाचे काम त्यांनी नेटाने उभे केले आहे. तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमासोबतच दुग्धव्यावसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना त्यांनी रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांनी विश्वासाचे घर निर्माण केले असून त्यांनी आता सक्रिय राजकारणात उतरले पाहिजेत अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा गैर नाही. भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपणास ग्वाही देतो की गणेश चिवटे यांना आपल्याला अपेक्षित असणाऱ्या पदापेक्षाही मोठे पद मिळेल यासाठी पक्षाची संपूर्ण ताकत मी त्यांच्या पाठीशी उभी करनार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे गणेश चिवटे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना आपला तालुका शेजारील इंदापूर, बारामती या तालुक्याच्या दृष्टीने रोजगार, तंत्रज्ञान, शिक्षण व आरोग्य याबाबत खूप मागास आहे त्यामुळे दूरदृष्टीने काम उभे करावे लागेल. लोकांचे आशिर्वाद व त्यांचे प्रेम या बळावर मी आज लोकांची सेवा, मदत करू शकलो. भविष्यात याच लोकांच्या पाठिंब्यावर तालुक्यातील सामान्य लोकांच्या पाठीशी आणखी खंबीरपणे उभे राहण्याचे काम करणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहु असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तालुका सरचिटणीस नितीन झिंझाडे म्हणाले की एकीकडे करमाळा तालुक्यातील आजवरच्या राजकीय प्रस्थापित लोकांनी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, कामगार यांच्या नावावर कर्ज काढून हजारो कुटुंबे देशोधडीला लावली तर दुसरीकडे गणेश चिवटे हे सर्वासामान्य माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहत आहेत. त्यामुळे लोकांच्या प्रश्नाची खरी जाण त्यांना असल्याने त्यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढवावी. भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार म्हणाले की, गणेश चिवटे यांनी दुग्धव्यवसाया सोबतच शालेय विद्यार्थींना मोफत अन्नदान, निराधार लोकांना मोफत जेवणाची सोय करून दिली, सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शाही थाटात अनेकांची लग्न लावून दिली. बांधकाम कामगारांना शासनाच्या अनेक योजना मिळवून दिल्या आहेत. भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे यांनीही तालुक्याच्या विकासासाठी चिवटे यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभा राहावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मिरगव्हाणचे माजी सरपंच मच्छिंद्र हाके, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खाडे व मिरगव्हाण येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले होते. सूत्रसंचालन भाजपा जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केले तर आभार भाजपा सहकार सेलचे आजिनाथ सुरवसे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, बिटरगाव चे सरपंच अभिजीत मुरूमकर, वंजारवाडीचे सरपंच प्रविण बिनवडे, उपसरपंच लक्ष्मण शेंडगे, बिभीषण गव्हाणे, हरिभाऊ झिंजाडे, विष्णू रंदवे, संदिपान कानगुडे, सोमनाथ घाडगे, दादासाहेब देवकर, नितीन निकम, नाना अनारसे, हनुमंत रणदिवे, गणेश परदेशी, भैय्या गोसावी, हर्षद गाडे, किरण शिंदे, सचिन कानगुडे, संदिप काळे, काका जाधव, गणेश माने, सचिन चव्हाण, संतोष जमदाडे, कपिल मंडलिक, नामदेव भोगे, जयसिंग भोगे, आबा वीर, प्रदीप वीर, सुनील नेटके, मोहन नेटके, तुकाराम भोसले, अशोक सातपुते, विशाल घाडगे, अजय डवले, मिरगव्हाणचे ग्रामपंचायत सदस्य सचिन लावंड, सुखदेव घरबुडे, चंद्रसेन घरबुडे, रेवनात लावंड, सोपान हाके, भागवत सुरवसे, एकनाथ लावंड, विठ्ठल वायसे, बंडू सुरवसे, आबा वायसे, स्वप्नील घरबुडे, गणेश हाके,काका हाके,बाळू गोवेकर, रवी खाडे, शहाजी हाके, विठ्ठल हाके, काका शिंदे, रामा खाडे, औदुंबर घरबुडे, अमोल ओहोळ, कृष्णा ओहोळ, आबा ओहोळ, बापू सुरवसे, धनराज सुरवसे, बालाजी वायसे, महादेव घरबुडे, रामदास लावंड, विठ्ठल पाटील, लक्ष्मण शिंदे, विकास हाके, संतोष भस्मे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.