shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पेन्शनर्स शिष्टमंडळाने घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची सकारात्मक भेट


नवी दिल्ली/ प्रतिनिधी:
पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची ३० ऑगस्ट रोजी भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली व लवकरच आपला पेन्शनवाढ प्रश्न मार्गी लागेल असे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांनी सांगितले.यूपीएस नवीन पेन्शन योजना लागू केल्यानंतर सरकारला इपीएस ९५ योजनेकडे सरकारने लक्ष देण्याचे ठरविले आहे.


गेल्या ७/८ वर्षापासून पेन्शनवाढीसाठी दिल्लीसह देशभर आंदोलने केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा शिष्टमंडळ भेटले.व आश्वासन देण्यात आले.परंतु ठोस कार्यवाही न झाल्याने ७७ लाख पेन्शनर्समध्ये असंतोष आहे.या काही दिवसात कामगार मंत्री, अर्थमंत्री यांच्या सोबत बैठका होत आहेत.२७ ऑगस्ट रोजी केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त तथा सचिव श्रम मंत्रालय रमेश कृष्णमुर्ती यांचेशी चर्चा झाली.२८ ऑगस्ट रोजी वित्त मंत्रालयात अतिरिक्त सचिव परमा सेन यांचेशी पेन्शनर्स समस्या व समाधान यावर सविस्तर चर्चा झाली.दि ३० ऑगस्ट रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचेबरोबर अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत,राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंह राजावत,राष्ट्रीय सल्लागार पी एन पाटील, राष्ट्रीय सचिव रमेश बहुगुणा, बी एस नारखेडे, महिला फ्रंट अध्यक्षा शोभाताई आरस,सरिता नारखेडे, आदींनी बैठकीत चर्चा केली.त्यात रु ७५००/- पेन्शनवाढ अधिक महागाई भत्ता विना भेदभाव मिळावा, उच्च पेन्शनचा लाभ पती पत्नीला मिळावा,वैद्यकीय मोफत सुविधा मिळावी. यासाठी पदाधिकारी यांनी अर्थमंत्री यांचेकडे आग्रह धरला.व ज्याप्रमाणे यूपीएस योजना प्रमाणे इपीएस ९५ योजनेतसुद्धा अंशदान देऊन वृद्ध पेंशनराना आर्थिक हातभार लागू शकतो. वित्तमंत्री यांनी सांगितले की इपीएफओच्या प्रस्तावावर विचार करून सरकार जरूर ठोस निर्णय घेणार आहे. सरकार देशातील वृद्ध पेन्शनर्सबद्दल संवेदनशील आहे.व वित्त मंत्रालयाकडून जे सहकार्य लागेल ते दिले जाईल.त्याचप्रमाणे २०७६ दिवसापासून बुलढाणा येथे सुरु असलेले इपीएस ९५ पेन्शनधारकांचे क्रमिक उपोषण समाप्त करावे... त्यांच्या या आश्वासनाने पेन्शनधारकांमध्ये अनेक वर्षाचा लढा संपुष्टात आल्याने सन्मानपूर्वक पेन्शन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.असे पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंगअण्णा जाधव यांनी सांगितले.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर,९५६११७४१११
close