अहिल्यानगर:-
*मागासलेल्या जाती जमाती साठी सरकारी नोकरीत 50 टक्के राखीव जागा देण्याचा देशातील पहिला जाहीरनामा करवीर संस्थानात राबविणारा राजा
*आंतरधर्मीय - आंतरजातीय विवाहास व नोंदणी पद्धतीस मान्यता देणारा कायदा
*सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा
*स्रियांच्या छळवणूकीस प्रतिबंध करणारा कायदा
*विविध जाती धर्मियांसाठी कोल्हापूरचा काडीमोड कायदा
*अनौरस संतती व जोगतिणी यांच्या विषयीचा कायदा
*कोल्हापुरात मल्ल विद्या, बलोपासना महत्त्व वाढावे म्हणुन सरकारी खर्चाने तालीमी उभारून जाहीर कुस्त्यांचे आखाडे आयोजन* (हलगीच्या तालावर आज ही असे आयोजन गावोगावी होते)
*संगीत ,चित्रकलाआणि नाटक यांना राजाश्रय देऊन त्या कलांचा बहर देशभर पसरवणारा राजा
*धार्मिक ग्रंथातील भाकड कथांचा फोलपणा सांगून लोकांना सत्य धर्म पाळण्याचा मार्ग दाखवणारा राजा
*पोलिस पाटलांना शिक्षण देणाऱ्या शाळा
*प्रत्येक गावात शाळा स्थापण्याचा जाहीरनामा
*विवीध जाती धर्मातील मुलांसाठी राज्यभर वसतिगृहे उभारून सक्तीचे शिक्षण ही मोहीम सुरू करणारा राजा
*शाळांमधील स्पर्शास्पर्श बंद करणारा राजा
*जोगिणी - देवदासी प्रथा निर्मुलनसाठी प्रयत्न
*अवघ्या 48 वर्षाच्या आयुष्यात डोंगरा एवढे महान कार्य उभे करणाऱ्या या समाज कल्याण करणाऱ्या राजाकडून परिवर्तन कार्याची स्फूर्ती घेऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करु या.