सोनई // प्रतिनिधी :
ज्येष्ठ समाजसेवक तथा पद्मभूषण अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशवाडी येथील रहिवासी व सध्या मुंबईत अतिरिक्त जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन, पश्चिम उपनगरे, वांद्रे) म्हणून कार्यरत असलेले गणेश मिसाळ, अपर जिल्हाधिकारी तथा सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबईचे दत्तात्रय नवले आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्तीय विकास महामंडळाचे अपर जिल्हाधिकारीतथाव्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली.यावेळी तिन्ही अधिकाऱ्यांनी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
अण्णांशी झालेल्या चर्चेदरम्यान विविध विषयांवर संवाद साधत जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला. गणेश मिसाळ व दत्तात्रय नवले हे नगर जिल्ह्यातील असल्याने अण्णांशी संवाद साधताना नगर जिल्ह्याशी संबंधित अनेक आठवणी आणि विषय चर्चेत आले.गावाकडच्या नात्याचा जिव्हाळाअण्णा हजारे यांचे सामाजिक कार्य आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात त्यांना विशेष मानाचे स्थान आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्याशी नाळ जोडलेल्या या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याने सामाजिक जिव्हाळ्याचे दर्शन घडले. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्या मातीशी आणि ज्येष्ठ समाजसेवकांशी असलेले नाते जपण्याचा संदेश या भेटीतून अधोरेखित झाला.
प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबत सामाजिक बांधिलकी गणेश मिसाळ, दत्तात्रय नवले आणि प्रकाश थविल हे तिघेही प्रशासकीय सेवेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. विविध विभागांच्या माध्यमातून जनतेशी संबंधित कामकाज हाताळताना त्यांनी अण्णा हजारे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक न राहता आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारी ठरली.अण्णा हजारे यांच्याशी झालेल्या चर्चेत जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने वातावरण काही काळ भावनिक झाले. नगर जिल्ह्यातील परिचित संदर्भ, सामाजिक कार्य आणि जुन्या आठवणींवरही अनौपचारिक गप्पा झाल्याचे सांगण्यात आले. तिन्ही अधिकाऱ्यांनी अण्णांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.

