shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • राजर्षी शाहु राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांना जाहीर...
  •              🌍
  • जागतिक योग दिनानिमित्त विद्या विकास मंदिर, निमगाव म्हाळुंगी येथे योग शिबिराचे आयोजन ..!
  •              🌍
  • ग्रामविकास अधिकारी टि के जाधव प्रदिर्घ सेवेतून निवृत्त
  •              🌍
  • जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके.*
  •              🌍
  • लाखेवाडी च्या 53 विद्यार्थ्यांचे CET -JEE-NEET परीक्षेत यश**यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन*
  • -->

    About Me

    NHAI ला पाठवलेल्या निवेदनाला प्रतिसादाची अपेक्षा – ऐतिहासिक गावांची नावे चुकीचे दर्शवल्याने नागरिकांचा संताप.

    NHAI ला पाठवलेल्या निवेदनाला प्रतिसादाची अपेक्षा – ऐतिहासिक गावांची नावे चुकीचे दर्शवल्याने नागरिकांचा संताप.

    एरंडोलचे'एरंडोळ' व पद्मालय चे 'पदमाळय'असे चुकीचे फलक – गावकऱ्यांनी मागितली तातडीने सुधारणा.
    NHAI ला पाठवलेल्या निवेदनाला प्रतिसादाची अपेक्षा – ऐतिहासिक गावांची नावे चुकीचे दर्शवल्याने नागरिकांचा संताप.

    एरंडोल व पद्मालय या ऐतिहासिक गावांची नावे राष्ट्रीय महामार्गावरील फलकांवर चुकीने लिहिल्यामुळे गावकऱ्यांत तीव्र नाराजी. अॅड. आकाश महाजन यांनी NHAI ला दिले निवेदन; लवकरात लवकर योग्य फलक लावण्याची मागणी.

    एरंडोल:- तालुक्यातील एरंडोल व पद्मालय या ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या गावांची नावे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चुकीचे दर्शवण्यात आली आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

    गावातील रहिवासी अॅड. आकाश महाजन यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI), जळगाव युनिटला निवेदन पाठवून ही गंभीर चूक तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले की, एनएच ६ महामार्गावर जळगाव व धुळे जिल्ह्यांच्या सीमारेषेवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवर 'एरंडोल' ऐवजी 'एरंडोळ' आणि 'पद्मालय'ऐवजी 'पदमाळय' असे चुकीचे नावे लिहिलेले आहेत.

    अॅड. महाजन यांच्या मते, या चुकांमुळे वाहनचालक व पर्यटक गोंधळून जात आहेत, तसेच गावाचा चुकीचा इतिहास निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गावांची नावे शासकीय नोंद वही,फलक आणि गुगल मॅपवर योग्यरित्या 'एरंडोल' व 'पद्मालय'अशीच आहेत.

    गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या गावांना ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असून महाभारत काळातील संदर्भ त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे चुकीच्या नावांमुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

    अशा प्रकारच्या चुकांमुळे गावांची ओळख गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी त्वरित योग्य ती दखल घेऊन 'एरंडोल' व 'पद्मालय' या नावांचे फलक लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

    गावकऱ्यांच्या भावना व ऐतिहासिक सत्यतेचा विचार करता, हे फलक लवकरात लवकर बदलणे अत्यावश्यक आहे. आता NHAI या निवेदनावर किती लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.




    close