आशिया चषक क्रिकेट स्पर्धा ही जगातील सर्वोत्तम स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेद्वारे आशिया खंडातील सर्वोत्तम संघ ठरविला जातो. सन १९८४ मध्ये पहिली आशियाई स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. एकदिवसीय आणि टी२० स्वरूपांमध्ये आलटून पालटून !न खेळली जाणारी हि एकमेव क्रिकेट स्पर्धा आहे.
क्रिकेटचं प्रमुख आकर्षण म्हणजे फलंदाजी. मग त्यामध्ये शांत, संयमी स्वभावाचे धिरोदात्त फलंदाज असतात तर काही आक्रमक वृत्तीचे स्फोटक फलंदाज असतात. तसे बघाल तर प्रत्येक फलंदाज परिस्थितीतून आपल्या खेळाचे गिअर बदलतो. त्यामुळेच तर ते फलंदाज कायम स्वरूपात स्मरणात राहातात. अशाच काही महान फलंदाजांच्या सर्वांगसुंदर खेळावर एक नजर टाकूया.
क्रिकेटचा देव, सचिन तेंडुलकर हा खेळातील एक दिग्गज आणि सर्वकालीन महान फलंदाज आहे. 'मास्टर ब्लास्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक फलंदाजी विक्रम आहेत. तो क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आहे, त्याच्याकडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आहेत, तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतक ठोकणारा (२०० धावा) पहिला खेळाडू आहे. सचिन, आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सन १९९० मध्ये या स्पर्धेत त्याने आपला पहिला सामना खेळला९७३. त्यानंतर त्याने २० हून अधिक सामने खेळले आहेत आणि धावा केल्या. त्याच्या १०० शतकांपैकी दोन शतके त्याने या स्पर्धेत केली आहेत, सन २०१२ च्या आशियाई स्पर्धेत मिरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याचे १०० वे शतक समाविष्ट आहे.
तेंडुलकर भारताच्या काही महान विजयांचा भाग राहिला आहे आणि बहुतेकदा, त्याने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो सन१९९१ आणि सन १९९५ मध्ये आशिया कप विजेत्या संघाचा भाग होता. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने संघाला योगदान तर दिलेच. शिवाय त्याने गोलंदाजी व रणनीतिक निर्णयांनी संघाच्या कार्यात योगदान दिले.
श्रीलंकेचा सनथ जयसुर्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम डावखुऱ्या फलंदाजांपैकी एक होता. जयसूर्य हा श्रीलंकेसाठी प्रत्येक अर्थाने महत्वाचा घटक होता. त्याच्या फलंदाजीचा कल हा अतिआक्रमक होता. तो अनेकदा सुरुवातीच्या षटकांमध्ये जेव्हा क्षेत्ररक्षणावर निर्बंध असतात तेव्हा पॉवरप्ले मध्ये भयंकर फटकेबाजी करायचा. अशा या विध्वंसक फलंदाजाकडे कोणताही हल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता होती. म्हणून सन १९९० च्या दशकात आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीला तो क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू फटकवायचा. त्याच्या जलद धावा करण्याच्या क्षमतेने श्रीलंकेला मोठे लक्ष्य उभे करण्यास आणि प्रतिस्पर्ध्याच्या कोणत्याही धावांचा पाठलाग करण्यास मदत केली. जयसूर्याने त्याच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले आणि तो आशिया कपमध्ये तो इतरांपेक्षा वरचढ ठरला होता. कारण त्याने सर्व श्रीलंकेच्या फलंदाजांमध्ये आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तो २५ आशिया कप सामन्यांमध्ये खेळला आणि ५३.०४ च्या आश्चर्यकारक सरासरीने १२२० धावा केल्या. यास्पर्धेत त्याने सहा शतके आणि तीन अर्धशतके ठोकली आहेत. तो एक अद्भुत गोलंदाज देखील होता आणि त्याने डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून संघाला सातत्याने मदत केली. तो १९९७, २००४ आणि २००८ मध्ये तीन वेळा आशिया चषक विजेत्या श्रीलंकेचा सदस्य होता.
श्रीलंकेचाच कुमार संगकारा हा एक सर्व गुणसंपन्न खेळाडू होता. तो एक विश्वासार्ह फलंदाज आणि सर्वोत्तम यष्टीरक्षक होता. त्याने अनेक वर्षे त्याच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व देखील केले आणि स्वतःला क्रिकेटमधील एक दिग्गज म्हणून स्थापित केले. तो आशिया चषकात २४ सामने खेळला आणि प्रति सामन्या ४८.८६ धावा सरासरीने १०७५ धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने सदर स्पर्धेत चार शतके आणि आठ अर्धशतके ठोकली. सन २००४, २००८ आणि २०१४ मध्ये तीन वेळा आशियाई अजिंक्यपद जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचा तो भाग होता. सन २००८ च्या स्पर्धेत तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता, तेंव्हा त्याने ३४५ धावा केल्या. हातात बॅट घेऊन संघाला दिलेल्या प्रचंड योगदाना व्यतिरिक्त, त्याने यष्टीरक्षक म्हणून त्याच्या संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. तो वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध उत्कृष्ट होता आणि त्याने यष्टीरक्षक म्हणून अनेक झेल घेतले. त्याच्या सर्व कामगिरीसाठी, तो आशिया कपच्या दिग्गज फलंदाजांमध्ये स्थान मिळवू शकला.
मोहम्मद युसूफ याने सन १९९८ मध्ये जेव्हा पाकिस्तानसाठी पदार्पण केले तेव्हा तो युसूफ योहाना होता. तो अशा वेळी संघात आला जेव्हा पाकिस्तानच्या मधल्या फळीत इजाज अहमद, इंझमाम-उल-हक आणि सलीम मलिक यांच्यासह काही प्रतिभावान फलंदाज होते. तो एक स्टायलिश फलंदाज होता. पाकिस्तानसाठी त्याने अनेक महत्वपूर्ण खेळ्या केल्या. त्याची वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोघांविरुद्धही तितकेच चांगले खेळण्याची क्षमता होती आणि तो चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात वाकबगार होता. मोहम्मद युसूफला इंझमाम आणि युनूस खान सारख्या दोन महान खेळाडूंसह पाकिस्तानच्या सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. पाकिस्तानसाठी त्याच्या अनेक महान खेळींपैकी, सन २००० च्या आशिया कपमधील त्याच्या शानदार कामगिरीसाठी तो विशेषतः लक्षात ठेवला जातो. त्याने त्या स्पर्धेत सलग तीन वेळा ५०पेक्षा धावा केल्या आणि पाकिस्तानला जेतेपद मिळवून देण्यात मदत केली. तो संघातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. निवृत्ती घेतल्यानंतर, त्याने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारली आणि तरुणांना त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार कामगिरी करण्यास मदत केली. मैदानावर आणि मैदानाबाहेर पाकिस्तान संघासाठी त्याने दिलेल्या योगदानामुळे तो एक महान खेळाडू बनला आहे आणि आशिया कपमधील त्याच्या चमकदार खेळींसाठी तो नेहमीच लक्षात राहील.
भारताचा महेंद्रसिंग धोनी आधुनिक काळातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून आजही गणला जातो. एम.एस धोनी किंवा एमएसडी तथा माही म्हणून त्याच्या चाहत्यात तो लोकप्रिय आहे. तो महान सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतर फक्त तिसरा सर्वात लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू आहे. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. एका सामान्य कुटुंबातून आलेला तो एक अद्भुत खेळाडू होता आणि आजपर्यंत त्याच्या अपारंपरिक फलंदाजी तंत्र आणि कर्णधारपदासाठी तो महान क्रिकेटपटूंकडून आदरणीय आहे. त्याच्या शांत स्वभावासाठी आणि दबावाखाली शांत राहण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जाणारा धोनी एक असाधारण नेता होता. जेव्हा तुम्ही आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलता तेव्हा धोनीचा उल्लेख येथे सापडणार नाही परंतु स्पर्धेत त्याच्या शौर्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही. त्याने खेळाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये टीम इंडियासाठी भरीव कामगिरी केली. त्याच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताने २०१६ मध्ये आशिया कप जिंकला. तेंव्हा ती स्पर्धा प्रथमच एकदिवसीय मालिकेऐवजी टी-२० स्वरूपात खेळली गेली. त्याच्या नेतृत्वासाठी आणि त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा तणावपूर्ण परिस्थितीत यशस्वी खेळ करण्याच्या क्षमतेसाठी, तो आशिया कपच्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवण्यास पात्र आहे.
युनूस खान त्याच्या अढळ जोश, जिद्द आणि प्रचंड एकाग्रतेसाठी ओळखला जातो. युनूस खान पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून गणला गेला. त्याचे मनगटी फ्लिक्स आणि क्लासिक ड्राइव्ह उत्कृष्ट होते आणि गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरायचा. युनूस खानने विश्वासार्ह मधल्या फळीतील फलंदाजांपैकी एक म्हणून संघात आपले स्थान पक्के केले होते. तो अनेकदा संघाचे नेतृत्व करण्याची भूमिका बजावत असे आणि मोठे डाव खेळत असे. आशिया कपमधील सर्वोत्तम फलंदाजी कामगिरी म्हणून ओळखली जाणारी मोठी खेळी तो सन २००४ च्या स्पर्धेत हाँगकाँगविरुद्ध खेळला. प्रथम फलंदाजी करताना, जलद विकेट गमावल्याने पाकिस्तान अडचणीत सापडला होता. पण, नेहमीप्रमाणे, युनूस खान संघाच्या मदतीला धावला आणि त्याने फक्त १२२ चेंडूत १४४ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे पाकिस्तानचा धावसंख्या ३४३ पर्यंत पोहोचला आणि त्यांनी १७३ धावांनी सामना जिंकला.
आशिया कपमध्ये काही महान फलंदाजी प्रतिभा पाहायला मिळाल्या आहेत आणि या सहा दिग्गज फलंदाजांनी स्पर्धेत खरोखरच चमक दाखवली आहे. हे खेळाडू भव्यतेचे प्रतीक आहेत आणि त्यांनी नेहमीच महत्त्वाच्या वेळी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यांचे रेकॉर्ड, प्रतिभा आणि योगदान आशिया कपच्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत त्यांचे स्थान सिद्ध करते. त्यांनी त्यांच्या देशाला अभिमान दिला आणि क्रिकेट इतिहासात त्यांचे नाव कोरले.
आता विद्यमान स्पर्धेत सहभागी आठ संघात अनेक मातब्बर फलंदाज आहेत. ते त्यांच्या संघासाठी काय किमया करतात याकडे समस्त क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले असणार, यात तिळमात्रही शंका नाही.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.