shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतीला नवे वळण : एरंडोलला शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांची दिशादर्शक कार्यशाळा.


आधुनिक तंत्रज्ञान,माती आरोग्य, ऍग्रो टुरिझमवर तज्ज्ञांचे मार्ग दर्शन;२५०विद्यार्थी व ५० शेतकऱ्यांचा सहभाग.

एरंडोल | प्रतिनिधी —
येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाच्या दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांवरील एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली.


ही कार्यशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्रसेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.

शेतीला नवे वळण : एरंडोलला शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांची दिशादर्शक कार्यशाळा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अमित पाटील, उद्घाटक म्हणून प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मा. मनीषकुमार आत्माराम गायकवाड उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अनिल जे. पाटील, आदर्श शेतकरी भाऊसो शालिकग्राम गायकवाड, श्री. समाधान पाटील (कृषी भूषण), मा. प्रवीण पाटील, प्रा. डॉ. संदीप नेरकर यांची उपस्थिती लाभली.

कार्यशाळेत कृषी पर्यटन, माती आरोग्य व माती परीक्षण, शासनाच्या विविध कृषी योजना व शेतकऱ्यांसाठी सवलती या विषयांवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ, मयुरी अनुप देशमुख, मंडल कृषी अधिकारी ईश्वर पवार, उप कृषी अधिकारी किशोर साळुंखे यांनी विविध सत्रांत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात २५० पेक्षा अधिक विद्यार्थी व ५० शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी सहायता उपक्रमांतर्गत तालुक्यातील तरुण शेतकरी व शेतकरी पुत्रांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.



🔹 मा. अमित पाटील (अध्यक्ष)
“वेळीच शेतीचे नियोजन केल्यास उत्पादन व उत्पन्न दोन्ही वाढते. भाजीपाला व फळपिके हे भविष्यातील शेतीचे मजबूत आधारस्तंभ आहेत.”

🔹 मा. मनीषकुमार आत्माराम गायकवाड (प्रांताधिकारी)
“शेतकऱ्यांच्या मुलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली तर हवामान, पीक पद्धती व उत्पादनावर अचूक नियंत्रण मिळवता येते.”


🔹 डॉ. अनिल जे. पाटील (प्राचार्य)
“अभ्यासक्रमासोबत शेतीविषयक व्यावहारिक ज्ञान मिळणे ही काळाची गरज आहे.”


🔹 श्री.शालिकग्राम गायकवाड (आदर्श शेतकरी)

“शेतीत नवकल्पना व जोड व्यवसाय स्वीकारल्यास शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो.”


🔹 श्री. समाधान पाटील (कृषी भूषण)
“माती आरोग्य समजून घेतल्याशिवाय शाश्वत शेती शक्य नाही.”


🔹 प्रा. डॉ. संदीप नेरकर
“विद्यापीठ व शेतकरी यांच्यातील संवाद शेती विकासाचा पाया आहे.”



close